Friday, July 11, 2008

किर्लोस आंबवणेवाडी गावाची वाटचाल..



स्थापना : 1983
किर्लोस आंबवणेवाडी सेवा मंडळ (मुंबई)
(रजि.नं.16383 जी.बी.बी.एस.डी)
एफ 8242 मुंबई
कार्यालय -'श्रमिक' 2रा माला खो.नं.219
साने गुरूजी मार्ग मुंबई नं. 12


स.न.वि.वि.
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की 'किर्लोस आबवणेवाडी सेवा मंडळ' हे अत्यंत कठिण परिस्थितीतून स्थापन करण्यात आलेले सेवा मंडळ आहे. गावातील आणि मुंबईतील ग्रामस्थांच्या सहकार्याने मंडळाने आजपर्यंत हाताळलेली सर्व कामे यथाशक्ती आपल्या मंडळाला सहकार्य देवून भविष्यात जी जी कामे येणार ती पूर्ण करण्यास सहकार्य करावे. आपल्या गावात जी जास्त शिक्षित तरूण मंडळी आहेत त्यांनी पुढे येवून मातृभूमिकरिता किंबहूना मातृभूमितील गरीब, गरजू, अशिक्षित लहान थोर मंडळीना मंडळाचे सभासद होऊन मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.मंडळाच्या स्थापनेपासून आज तारिखपर्यंत थोडक्यात कामाचा आढावा खाली देत आहोत.
मंडळाची स्थापना :
इ.स.1983 साली आंबवणेवाडीतील इयत्ता 6वी पर्यंतच्या वर्गाची शासनाच्या आदेशावरून उठविण्याची जी कारवाई होत होती त्या वादग्रस्त प्रश्नावरून सर्व ग्रामस्थ एकत्रित येवून मंडळाची स्थापना केली त्यानंतर आंबवणेवाडीतील शाळा आंबवणेवाडीतच रहावी या बद्दल मंडळाने संबंधीत अधिकाऱ्याशी संबंध साधून प्रयत्न केले व शाळा आंबणेवाडीतच स्थिर केली. आज तीच शाळा इयत्ता 7वी पर्यंत उपलब्ध आहे. शाळेतील इ. 1ली ते 7 वी पर्यंतच्या पहिल्या 3 क्रमांकाच्या मुलाना दरवर्षी येणाऱ्या 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिनी) मंडळातर्फे बक्षिस देऊन त्यांचा गौरव केला जातो.
रस्ता :
आपल्या गावात या पूर्वी साधी पायवाट उपलब्ध होती मंडळाने या बाबतीत प्रयत्न करून ग्रामस्थांच्या मदतीने एस.टी गाडी येईल असा रस्ता पूर्ण केला आणि 4 ते 5 वर्षे एप्रिल मे मध्ये कणकवली पिसे कामते मार्गे किर्लोस गाडी सुरू केली सरकारच्या काही धोरणामुळे ती गाडी सध्या बंद आहे पण कणकवली असरोंडी मार्गे किर्लोस गाडी सुरू आहे.
आज गावात आजारी पडलेल्या व्यक्तिला सहजतेने गाजीत बसून कणकवली किंवा मुबईला जाता येते. दि. 10.6.98 ला ग्रामपंचायतीला पत्रक आणि मा. माजी पालक मंत्री श्री नारायणराव राणे यांना 161198 त्या पत्रकानुसार श्री पावणादेवी मंदीर पर्यंत रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले म्हणूनच आज मारुती व सुमो त्या रस्त्यावर दिसत आहेत.
सातरल:कासरल मार्गे कणकवलीला जाण्याकरिता आणि आंबणेवाडी ते मालवणला जाण्याकरिता एस.टी गाडीची सोय व्हावी अशी 10698 पासूनची आमची मागणी आहे. या संदर्भात मा. आमदार श्री आंप्पा साहेब गोगटे आणि माजी मुख्यमंत्री मा. आमदार श्री. नारायणराव राणे यांना वारंवार पत्र व्यवहार सुरू आहेत. 201098 ला सातरल:कासरल सरपंच यांना पत्र व्यवहार केलेला आहे प्रयत्न सुरू आहेत.
शाळाबालवाडी :-
गावीतील लहान मुलांची (शिशू वर्गाची) शिक्षणाची सोय व्हावी या करिता मंडळाने स्वत: प्रयत्न करून मंडळाच्या इमारती मध्ये जागा उपलब्ध करून मंडळाच्या वतीने कु. छाया गणपत लाड. कु.शालिनी कृष्णा लाड या मुलींना मानधन देवून शिशू वर्ग सुरू केले. खाऊची सोय श्री अर्जुन (बाळा) लाड हे करीत होते. कालांतराने बालवाडीचे रुपांतर सरकार तर्फे अगंणावाडी मध्ये झाले त्याकरिता सुध्दा एस.एस.सी. पास शिक्षिका हवी होती ते शोधण्याचे काम सुध्दा मंडळाच्या कार्यकर्त्यानी केले. आणि सौ. रूपा रमेश महाडीक यांची नियुक्ती केली. गं.भा. सरस्वती स. खांदारे यांची सुध्दा नियुक्ती केली आणि आज दोन व्यक्तिचा त्यावर उदरनिर्वाह चालू आहे.
शाळेच्या जुन्या इमारतीच्या दोन्ही बाजूला वाढीव इमारत सरकार दरबारी प्रयत्न करून वाढवून घेतली. इमारती मध्ये मंडळाच्या खर्चातून लाईट फीटींग मीटर बसवून घेण्यात आले त्याला लागणारी वायर कै.दशरथ विष्णू लाड यांनी उपलब्ध करून दिली ग्रामस्थांनी वर्गणीच्या माध्यमातून शाळेला कुंपण घालण्याचे काम सुरू आहे जुन्या इमारतीमध्ये फळयांचे पार्टीशन करण्यास मंडळाने भाग पाडले.
दि. 24698 रोजी शाळेतील मुख्याध्यापकांचे शाळेमध्ये सरकार तर्फे वाढविस्तार योजना राबविण्याकरिता 10 हजार रुपये जमा करण्याचे पत्र मंडळाच्या नेवे आले. त्यापासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून 5301 पर्यंत जवळ जवळ 15 हजार रुपये सामान आलेले आहे.
इमारत :
· मंडळाच्या स्थापनेनंतर आपल्या गावात मंडळाची इमारत असावी या साठी मंडळाने सभासदांकडून निधी गोळा करून ग्रामस्थांनी श्रमदान करून आज मंडळाची इमारत गावात उपलब्ध करू ठेवली आहे. इमारतीसाठी लागणारी जमीन श्री सिताराम बुधाजी महाडीक यांनी उपलब्ध करून देवून मंडळाला बहुमोलाचो सहकार्य केले आहे. आज त्याच इमारतीमध्ये श्री पावणादेवी सहकारी सोसायटीचे किराणा मालाचे दुकान कार्यरत आहे. तसेच रॉकेलचा परवाना मंडळाने मिळविलेला आहे याचा फायदा ग्रामस्थांना होत आहे.
पाणीपुरवाठा :
पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत गाव तळी बांधणे व नवीन विहीरी बांधणे ही कामे थोडया फार प्रमाणात प्रगती पथावर आहेत.
गावतळीला नळ योजना व्हावी म्हणून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे आणि माननीय श्री. नारायणराव राणे यांना निवेदने देऊन आज गावाला तळी बांधून मिळाली त्याच तळीला आज नळ योजना झालेली आहे त्याकरिता सरकारी दरबारी अनेक प्रयत्न करावे लागले. वेळ प्रसंगी मंजूरी कमी असल्याने मंडळाने शिवाजी मंदिर आणि रविंद्र नाटय मंदिर येथे मदतीकरिता नाटकांचे प्रयोग केले आणि निधी उपलब्ध केला. नळ योजना व्हावी म्हणून श्री. गणेश संभाजी लाड यांनी पंप आणि पाईप बक्षिस रूपाने दिले काही ग्रामस्थांनी देणगी देवून हातभार लावला ग्रामस्थांनी श्रमदान केले 20501 रोजी नळाद्वारे ग्रामस्थांना पाणी मिळावयास लागले.
इतर कामे :
दि. 15-6-98 च्या मंडळाच्या पत्राप्रमाणे गोठणे गावच्या सरपंचानी साकवाच्या बाजूला असलेल्या वहाळीला पक्का साकव करुन दिला त्याचे श्रेय कै.सरपंच रामचंद्र बाईत यांना जाते. गडनदींला बाधण्यात आलेल्या साकवापासून आंबवणेवाडी पर्यंत 3 फूटाची पाऊलवाट सरपंचांना पाठविलेल्या पत्रावरून त्यांनी ती वाट पूर्ण केली.
स्मशान भूमिकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व्हावा. स्मशान भूमिमध्ये शेड, मयत व्यक्तिला जाळण्यात येणारी लाकडे, सरळ राहण्यासाठी लोखंडी खांब, रस्त्यावर लाईटची सोय, गोठणे माळावर धरण या मागण्या 1985 पासूनच्या आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत. राहिलेली कामे ग्रामपंचायतीच्या विचारधीन आहेत.
नदीपलीकडे पावसाळी जाणे गैरसोयीचे होते म्हणून वारंवार प्रयत्न करून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे यांनी गडनदीला पक्का साकव बांधून दिला. बांधल्यानंतर बरेच अडथळे आले त्याकरिता वेळोवेळी मंडळाने संबंधीत खात्याशी संपर्क साधून ते अडथळे दूर केले. आता त्या साकवाला रंग लावण्यात या हि मागणी केलेली आहे. साकव झाल्याकारणाने लोकांना, तुम्हा, आम्हाला, ग्रामस्थांना सहजतेने पावसाळी नदीपलीकडे जाता येते.
हे मंडळ स्थापन होण्याकरिता खालील व्यक्तिचे मोलाचे सहकार्य लाभले. कै. शांताराम म. आंगणे, कै. रावजी गो. महाडीक, कै. दत्ताराम भी. महाडीक, कै.गोपाळ गो. लाड, श्री. नारायण बा. लाड, ब्रम्हाजी ल. लाड, अनंत रा. लाड, दत्ताराम ल. लाड, विठ्ठल सि. खांदारे, पुरुषोत्तम गो. लाड, रामचंद्र आ. लाड, दिपक ज. लाड, केशव स. चव्हाण, भास्कर स. वाघरे, चंद्रकांत वा लाड, शांताराम ना. वारंग, सिताराम गो. उबारे, अनंत गावडे, दत्ताराम अ. लाड, विष्णऊ ल. लाड, आत्माराम सं. लाड, वासुदेव म. लाड, कृष्णा गो. लाड, कृष्णा गो. खांदारे, लवू गु. खांदारे, आत्माराम बा. लाड, सिताराम ल. लाड, सिताराम के. लाड, कृष्णा ज. लाड, कृष्णा ज. लाड, सुभाष अ. वारंग, आणि इतर ग्रामस्थ.
आपणास या पत्रकाद्वारे आव्हान करण्यात येते की मंडळाला सध्याचे सभासद हे वाडीच्या विकासाच्या बाबतीत पुरेसे नसून त्या करिता नवीन सुशिक्षित तरूण उमेदवारांनी सहभाग घेऊन वाडीतील इतर मतभेद बाजूला ठेवून वाडीच्या विकासासाठी एकत्रीत येणे जरूरीचे आहे. त्यासाठी आपण तरूणांनी मंडळाचे सभासद होऊन मातृभूमिला उपकृत मदत करावी हि विनंती.
दि. 181298 रोजी सिंधुदूर्ग जिल्हा विकास महामंडळ (मुंबई) या महामंडळाचे आपल्या मंडळाला सभासदत्व मिळालेले आहे.

1 comment:

Vijay said...

vishwanath just now i went through
your newly created blog sight i feel it is very useful source to whome who are not much familier to this beautiful Ambawnewadi. I would like to suggest that add some maps on the subject as well as Aerial pictures probably taken from Google earth. Thanks....

Vijay Parab Titwala