Friday, July 11, 2008

गडनदींला बाधण्यात आलेल्या साकवा...

दि. 15-6-98 च्या मंडळाच्या पत्राप्रमाणे गोठणे गावच्या सरपंचानी साकवाच्या बाजूला असलेल्या वहाळीला पक्का साकव करुन दिला त्याचे श्रेय कै.सरपंच रामचंद्र बाईत यांना जाते. गडनदींला बाधण्यात आलेल्या साकवापासून आंबवणेवाडी पर्यंत 3 फूटाची पाऊलवाट सरपंचांना पाठविलेल्या पत्रावरून त्यांनी ती वाट पूर्ण केली.
स्मशान भूमिकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व्हावा. स्मशान भूमिमध्ये शेड, मयत व्यक्तिला जाळण्यात येणारी लाकडे, सरळ राहण्यासाठी लोखंडी खांब, रस्त्यावर लाईटची सोय, गोठणे माळावर धरण या मागण्या 1985 पासूनच्या आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत. राहिलेली कामे ग्रामपंचायतीच्या विचारधीन आहेत.
नदीपलीकडे पावसाळी जाणे गैरसोयीचे होते म्हणून वारंवार प्रयत्न करून मा. आमदार श्री. आप्पा साहेब गोगटे यांनी गडनदीला पक्का साकव बांधून दिला. बांधल्यानंतर बरेच अडथळे आले त्याकरिता वेळोवेळी मंडळाने संबंधीत खात्याशी संपर्क साधून ते अडथळे दूर केले. आता त्या साकवाला रंग लावण्यात या हि मागणी केलेली आहे. साकव झाल्याकारणाने लोकांना, तुम्हा, आम्हाला, ग्रामस्थांना सहजतेने पावसाळी नदीपलीकडे जाता येते.

No comments: